शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

शिरोळला नदी प्रदूषणातून मुक्ती केव्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:04 IST

संदीप बावचे।लोकमत न्यूज नेटवर्कगेल्या अनेक वर्षांपासून नदीक्षेत्रात वाढलेले औद्योगीकरण, शहरातील सांडपाणी यामुळे वरदान ठरलेली पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी शाप ठरली आहे. नदी प्रदूषणावर प्रत्येक वर्षी आंदोलने होत असतात, जनहित याचिका दाखल झाली आहे. मात्र, लोकांच्या जिवावर उठलेले पाणी प्रदूषणाच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघाला नाही. वारणेचे पाणी इचलकरंजीकरांना देणार नाही, यानिमित्ताने ...

संदीप बावचे।लोकमत न्यूज नेटवर्कगेल्या अनेक वर्षांपासून नदीक्षेत्रात वाढलेले औद्योगीकरण, शहरातील सांडपाणी यामुळे वरदान ठरलेली पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी शाप ठरली आहे. नदी प्रदूषणावर प्रत्येक वर्षी आंदोलने होत असतात, जनहित याचिका दाखल झाली आहे. मात्र, लोकांच्या जिवावर उठलेले पाणी प्रदूषणाच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघाला नाही. वारणेचे पाणी इचलकरंजीकरांना देणार नाही, यानिमित्ताने पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता तरी पंचगंगा प्रदूषणमुक्त होणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.पंचगंगा नदीमुळे शिरोळ तालुक्यातील शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, शिरढोण, तेरवाड, कुरुंदवाड, शिरोळसह सुमारे तेवीस गावे ओलिताखाली आली. त्यामुळे शेती हिरवाईने नटली. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र, बारमाही वाहणाऱ्या या नदीमुळे काठावरील गावांत औद्योगिक क्षेत्र वाढले अन् कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत औद्योगीकरणाचे, शहरातील सांडपाण्याचे पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत गेला. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे नदीपात्रातील पाणी स्वच्छ करणारे नैसर्गिक जलचर प्राणी नाश पावत असल्याने पाणी प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे. जलपर्णीने पंचगंगा नदी व्यापून गेली, असे चित्र दिसत आहे.वाहून येणारे प्रदूषित पाणी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ व तेरवाड या शेवटच्या बंधाºयावर येऊन तटत असल्याने याचा फटका या तालुक्यालाच बसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम तर होत आहेच, शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे पिकाऊ जमीन नापीक बनत आहे. त्यामुळे शेतकरीही नापीक शेतीमुळे बेकार बनत आहेत. वारणा बचावच्या निमित्ताने पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी प्रत्येक गावात सांडपाणी प्रकल्प उभारण्याची गरज आहे.वारणेसाठी नागरिकांची वज्रमूठइचलकरंजीच्या अमृत योजनेला वारणेतून एक थेंबही पाणी देणार नाही यासाठी दानोळीसह वारणाकाठच्या गावांनी लढा सुरू केला आहे. गेल्या चौदा महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने वारणाकाठच्या शेतकºयांनी जनजागृती सुरू केली आहे. इचलकरंजी पालिकेने पोलीस बळाचा वापर करून दानोळी येथे वारणा योजनेचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकीच्या बळावर दानोळीकरांनी हा प्रयत्न हाणून पाडला. वारणेच्या पाण्यावरून मोठा संघर्ष सुरू झाला आहे. शिरोळ तालुक्यासह वारणाकाठाकडून आंदोलनासाठी वज्रमूठ बांधली जात आहे.नदी प्रदूषणाचे विषरसायनयुक्त दूषित पाणी थेट पंचगंगेबरोबर कृष्णा नदीत मिसळत असल्याने दरवर्षी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. सांगलीकडून येणाºया दूषित पाण्याचा फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे. कॅन्सरसारख्या भयावह रोगाने तालुक्याला ग्रासले आहे. त्यामुळे शासनाने नदी प्रदूषणमुक्तीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील जनतेतून होत आहे.दानोळीकरांचे इचलकरंजीला बळइचलकरंजी नगरपालिकेने पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाले म्हणून मजरेवाडीतून कृष्णेची पाणी योजना राबविली, तर शहरासाठी तिसरी पाणी योजना म्हणून शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील वारणा नदीतून राबविली जाण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, वारणा बचाव कृती समितीने वारणेतून योजना राबविण्यापेक्षा पंचगंगा प्रदूषणमुक्त करावी यासाठी वारणाकाठचे पाठबळ असेल, अशी भूमिका घेतली.